छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन दिन सर्वत्र साजरा होत आहे. रायगडवरील ही घटना म्हणजे भारताच्या इतिहासातील हिंदवी स्वराज्य स्थापनेचा सुवर्ण क्षण आहे. सर्वांच्या सहभागाने शिवोत्सव महाप्रतियोगीता आयोजित करून आपण हा उत्सव साजरा करत आहोत.
या निमित्त आयोजित निबंध लेखन स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रतिष्ठित व्यक्तींचे जीवन, काळ आणि बहुआयामी कामगिरीच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण प्रवास सुरू करण्यासाठी आपणास आमंत्रित करीत आहोत.
संकल्पना : छत्रपती श्री शिवाजी महाराज
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवन आणि शासनाचे विविध पैलू जसे त्यांची लष्करी प्रतिभा, प्रशासकीय सुधारणा, मुत्सद्दी पराक्रम आणि सांस्कृतिक योगदान इत्यादींचा शोध घेण्यासाठी सहभागीतांना प्रोत्साहित केले जाते. इतिहासामध्ये डोकावून पहा आणि जाणून घ्या कसे शौर्य, न्याय आणि सुशासन या मूल्यांच्या सहाय्याने छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी एका छोट्याश्या राज्याचे रूपांतर कसे शक्तिशाली साम्राज्यामध्ये केले.
तुमच्या निबंध किंवा लेखांमध्ये तुम्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा भारताच्या सामाजिक-राजकीय भूदृश्येवरील चिरस्थायी प्रभाव, धार्मिक सहिष्णुतेबद्दलची त्यांची बांधिलकी आणि न्याय्य आणि समृद्ध राज्यासाठी त्यांची दृष्टी याविषयी प्रतिबिंबित करू शकता. या स्पर्धेत भाग घेऊन, तुम्हाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विलोभनीय जगाचा शोध घेण्याची, त्यांच्या नेतृत्वगुणांपासून शिकण्याची आणि आपल्या लोकांप्रती असलेल्या त्यांच्या अतूट समर्पणापासून प्रेरणा घेण्याची संधी आहे.
या दूरदर्शी नेत्याची कीर्ती सर्वदूर पसरविण्यास आणि त्यांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आमच्या या स्पर्धेत सामील व्हा आणि त्यांचे उल्लेखनीय जीवन आणि वारसा सखोल समजून घेण्यासाठी योगदान द्या. तुमचा निबंध आणि लेख भारतातील महान ऐतिहासिक व्यक्तींबद्दल नवीन दृष्टीकोन देण्याची गुरुकिल्ली ठरू शकते.