छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन दिन सर्वत्र साजरा होत आहे. रायगडवरील  ही घटना म्हणजे भारताच्या इतिहासातील हिंदवी स्वराज्य स्थापनेचा सुवर्ण क्षण आहे. सर्वांच्या सहभागाने शिवोत्सव महाप्रतियोगीता आयोजित करून आपण  हा उत्सव  साजरा करत आहोत.

 या निमित्त आयोजित  निबंध लेखन स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रतिष्ठित व्यक्तींचे जीवन, काळ आणि बहुआयामी कामगिरीच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण प्रवास सुरू करण्यासाठी आपणास आमंत्रित करीत आहोत.

 

संकल्पना : छत्रपती श्री  शिवाजी महाराज

           छत्रपती श्री  शिवाजी महाराजांच्या जीवन आणि शासनाचे विविध पैलू जसे त्यांची लष्करी प्रतिभा, प्रशासकीय सुधारणा, मुत्सद्दी पराक्रम आणि सांस्कृतिक योगदान इत्यादींचा शोध घेण्यासाठी सहभागीतांना प्रोत्साहित केले जाते. इतिहासामध्ये डोकावून पहा आणि जाणून घ्या कसे शौर्य, न्याय आणि सुशासन या मूल्यांच्या सहाय्याने छत्रपती श्री  शिवाजी महाराजांनी एका छोट्याश्या राज्याचे रूपांतर कसे शक्तिशाली साम्राज्यामध्ये केले. 

           तुमच्या निबंध किंवा लेखांमध्ये तुम्ही छत्रपती श्री  शिवाजी महाराजांचा भारताच्या सामाजिक-राजकीय भूदृश्येवरील चिरस्थायी प्रभाव, धार्मिक सहिष्णुतेबद्दलची त्यांची बांधिलकी आणि न्याय्य आणि समृद्ध राज्यासाठी त्यांची दृष्टी याविषयी प्रतिबिंबित करू शकता. या स्पर्धेत भाग घेऊन, तुम्हाला छत्रपती श्री  शिवाजी महाराजांच्या विलोभनीय जगाचा शोध घेण्याची, त्यांच्या नेतृत्वगुणांपासून शिकण्याची आणि आपल्या लोकांप्रती असलेल्या त्यांच्या अतूट समर्पणापासून प्रेरणा घेण्याची संधी आहे.

           या दूरदर्शी नेत्याची कीर्ती सर्वदूर पसरविण्यास आणि त्यांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आमच्या या स्पर्धेत सामील व्हा आणि त्यांचे उल्लेखनीय जीवन आणि वारसा सखोल समजून घेण्यासाठी योगदान द्या. तुमचा निबंध आणि लेख भारतातील महान ऐतिहासिक व्यक्तींबद्दल नवीन दृष्टीकोन देण्याची गुरुकिल्ली ठरू शकते.

लेखनाची भाषा मराठी | हिंदी | English

स्पर्धा खालील गटांमध्ये होईल

गट
पात्रता
शब्द मर्यादा
प्रवेश शुल्क
गट 1
वर्ग 4 ते 7
जास्तीतजास्त 500 शब्द
20 रू.
गट 2
वर्ग 8 ते 12
जास्तीतजास्त 1000 शब्द
30 रू.
गट 3
खुला वर्ग
जास्तीतजास्त 2500 शब्द
50 रू.

नियम व अटी

  1. स्पर्धेमधे दिलेल्या विषयातील निबंधाचाच स्वीकार केला जाईल. 
  2. निबंध किंवा लेख स्वलिखित असावा. 
  3.  निबंध किंवा लेख मराठी, हिंदी व इंग्रजी या पैकी एका भाषेत असावा. 
  4. निबंध हस्तलिखित आणि टाईप करून (pdf) दोन्ही फॉरमॅटमध्ये पाठवणे आवश्यक आहे.
  5. प्रत्येक स्पर्धक कमीत कमी एक व जास्तीत जास्त कितीही निबंध सादर करू शकतो. पण असे करताना त्यास प्रत्येक निबंधासाठी नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.
  6. निबंध सादर करण्याची शेवटची तारीख 31मार्च 2024 आहे. त्यापूर्वी सदर निबंध, संस्थेच्या वेबसाईटवर अपलोड होणे गरजेचे आहे. त्यानंतर आलेल्या कुठल्याही निबंधाचा स्वीकार केल्या जाणार नाही.
  7. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहभाग शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करावे. सदर शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. एकापेक्षा अधिक निबंध सादर करायचे असल्यास प्रत्येक अतिरिक्त निबंधासाठी शुल्क भरावे लागेल.
  8. आलेल्या प्रवेशिकांमधून निबंधातील विचार, विषयाला दिलेला न्याय, मांडणी, वाक्यांची रचना, भाषेचे सौष्ठव, आणि शब्दांची मर्यांदा इत्यादी निकषांवर प्राथमिक निवड केली जाईल. 
  9. प्राथमिक फेरीत पात्र ठरलेल्या प्रवेशिका शिवोत्सव च्या वेबसाईटवर मतदानासाठी www.rfbharat.com वर सगळयांना पाहता येतील.
  10. निबंधाचे परीक्षण ऑनलाईन पद्धतीने होणारे मतदान आणि मान्यवर परीक्षकांचे गुण यांचा एकत्र विचार करून केल्या जाईल.
  11. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल व तो प्रत्येक स्पर्धकावर बंधनकारक असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार अथवा चर्चा होणार नाही. 
  12. संस्थेतर्फे प्रकाशित केल्या जाणा-या मुद्रित, डिजिटल अथवा तत्सम कोणत्याही प्रकारच्या माध्यमांमधे या स्पर्धेसाठी सादर केलेल्या निबंधाचा समावेश केला जाऊ शकतो, त्याबद्दल स्पर्धकाची कोणत्याही प्रकारची हरकत नसेल. 
  13. स्पर्धेत सहभाग घेणा-य़ा प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र इमेलद्वारे दिले जाईल.
  14. सादर केलेल्या निबंधातील सर्व आशयाचा (कन्टेन्ट) तसेच त्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतल्या गेल्यास त्याची पूर्णतः जबाबदारी स्पर्धकांची राहील. त्यात प्रकाशित होणाऱ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भावार्थामुळे उद्भवणाऱ्या कुठल्याही आक्षेपासाठी आयोजक संस्था जबाबदार राहणार नाही.
  15. गट १ व २ करिता शाळेचा त्या वर्गात शिकत असल्याचा पुरावा जोडावा. 
  16. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला प्रवेश शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. 
  17. स्पर्धेच्या अटी व दिनांक अंशतः किंवा पूर्णतः बदलण्याचा अधिकार आयोजकाचा असेल. त्यावर आयोजकांचे निर्णय अंतिम राहील. 10